'शिक्षण कट्टा'-'शैक्षणिक प्रगती चाचण्या'...
शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. शिक्षकतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक आणि विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे आयोजन केले जाते.
शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता विषयी मार्गदर्शन
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे विविध विषयांचे आयोजन केले जाते. यावेळी "शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता" या महत्वाच्या विषयासंदर्भात शिक्षणकट्टयावर शिक्षक, पालक, यांची चव्हाण सेंटर मध्ये सकारात्मक चर्चा झाली. सुरुवातीला श्रीमती बसंती रॉय यांनी उपस्थित पालक शिक्षक आणि पत्रकारांना कार्यक्रमाचे स्वरुप समजावून सांगितले आणि आजचा विषय शिक्षण हक्क कायदा आणि गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले. सध्या पहिली ते आठवी पर्यंत मुलांना अधिनियम निष्पती केंद्रिय शाळांना लागू करण्यात आली आहे. म्हणजेच काही ठराविक गोष्टी मुलांना आल्याच् पाहिजेत असे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम सध्या तेलांगना राज्यात लागू करण्यात आला आहे. यावर उपस्थितांची मते संयोजक डॉ.वसंत काळपांडे जाणून घेतली. उपस्थित शिक्षकांची समस्या जाणून घेऊन काळपांडे यांनी मार्गदर्शन केले.